पुणे :- कासारसाई धरण क्षेत्रात सततच्या पडत असणाऱ्या पावसामुळे धरण पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत असून कासारसाई धरण ८० टक्के भरले आहे. अशी माहिती प्रशासनाने दिली आहेे.
तसेच पाऊस चालू/वाढत राहिल्यास व येवा (धरणात जमा होणारे पाणी) वाढत गेल्यास परिस्थितीनुसार ६ ते १२ तासांमध्ये धरणाच्या सांडव्यावरून कासारसाई नाला पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता आहे.
नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. सखल भागातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. असे आवाहन देखील प्रशासनाकङून करण्यात आले आहे.
खडकवासला धरणातून ४२८ क्यूसेकने विसर्ग..
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात होणारा विसर्ग आज (२६ जुलै,बुधवार) दुपारी १२.०० कमी करून ४२८ क्यूसेक करण्यात आला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग कमी/जास्त होण्याची शक्यता आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.