जुन्नर -जुन्नर तालुक्यातील 17 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून ग्रामपंचायत निवडणुकीतून आपल्याच गटाची सत्ता आली पाहिजेत यासाठी विकासकामांच्या जोरावर मते फिक्स करण्याचा प्रचार सुरू झाला. विकासकामांचा फॉर्मुला राबवण्यात कोणताही गट मागे राहिलेला नाही.
तालुक्यात 17 ग्रामपंचायतीचे निवडणुकीचे रणधुमाळी सुरू झाली असून या निवडणुकीत आपलाच पॅनल निवडून आला पाहिजेत यासाठी कार्यकर्ते इर्शेला पेटल्याचे दिसून येत आहे. या इर्सेतूनच सर्वसामान्य लोकांची मते आपल्याकडे वळवण्यासाठी विकासकामांचा बोलबाला सुरुवात केली आहे.
बुधवारी (दि. 7) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता उमेदवारी अर्ज मागे घेण्यात मुदत संपताच निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्याने गाव गावच्या नेतेमंडळींनी आपलाच पॅनल निवडून यावा यासाठी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे.
तालुक्यातील 17 ग्रामपंचयतींच्या 17 लोकनियुक्त सरपंचपदासाठी 35 तर 140 सदस्य पदांसाठी 210 उमेदवार भवितव्य आजमवित आहेत. निरपेक्ष वातावरणात मतदारांनी मतदान केले पाहिजे यासाठी प्रशासनाकडून जनजागृती सुरू केली आहे.