चिंबळी -खेड तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रात असलेल्या दक्षिण भागातील चिंबळी, कुरुळी परिसरात मंगळवारी (दि. 7) पहाटे अचानक पडलेल्या अवकाळी पावसाने शेतकरी वर्गाची चांगलीच धांदल उडाली. गेल्या चार महिन्यांपूर्वी चिंबळी परिसरात शेतकरी वर्गानी सोयाबीन इतर पिकाची काढणी करून ट्रॅक्टरच्या साह्याने शेतीची मशागत करून शेतखत टाकून कांदा, गहू, ज्वारी, हरभरा पिकाची लागवड केली.
वेळेवर पाणी घालून खुरपणी करून पिकाची चांगली निगा राखली. गहू पिकाचे उत्पन्न भरघोस मिळणार असल्यामुळेच समाधान व्यक्त केले. गेल्या आठवडाभरापासून या पिकांची काढणी करुन ज्वारी, गव्हाची मळणी करून जनावरांना सुका चारा म्हणून साठवणूक करीत असतानाच अचानक पङलेल्या अवकाळी पावसाने शेतकरी वर्गाची धावपळ करून ठेवली.