पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या यंदाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठीच्या विद्यार्थी संख्येत मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 61 हजार 708 एवढी घट झाली आहे.
राज्यात सीबीएसई, आयसीएसई बोर्डांच्या शाळांची संख्या वाढत आहे. जन्मदाराचा परिणाम, करोना काळात वाढलेली शाळाबाह्य मुलांची संख्या, इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्यात येते.
इयत्ता नववीला विद्यार्थी नापास होत असल्याची परिस्थितीही आढळलेली आहे, अशी काही निरीक्षणे बोर्डाने नोंदवली आहेत. मात्र, ही संख्या वाढण्यासाठी बोर्डाकडून काही ठोस पावले उचलण्यात येतील का, याबाबत मात्र बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी मौन पाळले आहे.
विद्यार्थ्यांसाठी सूचना…
परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी अर्धा तास आधी केंद्रावर यावे सकाळी 10.30, दुपारच्या सत्रात 2.30 वाजता विद्यार्थ्यांनी परीक्षा दालनात उपस्थित राहवेच लागणार परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वाटपाची सुविधा यंदापासून रद्द पेपरच्या निर्धारित वेळेनंतर शेवटी दहा मिनिटे वाढवून देण्यात आलेली आहेत.