पुणे –अफगाणिस्तान येथे सत्ता मिळवण्यासाठी तालिबान्यांनी निष्पाप जीवांची हत्या केली. त्यांना श्रद्धांजली अर्पण करून अफगाणिस्तान येथे शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी जैन समाजातील अग्रगण्य संस्था असलेल्या जय आनंद ग्रुप, पुणे यांच्यातर्फे रुणवाल शिखर, सॅलेसबरी पार्क येथे “शांतीजाप’चे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी जय आनंद ग्रुपचे अध्यक्ष विजय चोरडिया, दी पूना मर्चंट चेंबरचे उपाध्यक्ष अशोक लोढा, सचिव अनिल लुंकड, माजी अध्यक्ष राजेंद्र बांठिया, पद्ममणी तीर्थचे अध्यक्ष प्रकाश गांधी, शाम कर्नावट, पृथ्वीराज धोका, रमण कोठारी, विजय धोका, शांतीलाल देसरडा, दिलीप धोका, मंगेश खाटेर, गणेश कटारिया, विजय पारख, विजयकुमार मर्लेचा, प्रवीण तालेडा, शांतिलाल नवलाखा, संजय कटारिया, ईश्वर बोरा, आनंद कोठारी, किशोर छाजेड, प्रमोद छाजेड, संतोष कर्नावट, आनंद कुवाड, नितीन ओस्तवाल आदी उपस्थित होते.