बेल्हे – जुन्नर तालुक्याला दुष्काळाच्या झळा बसायला लागल्या असून धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे पाणी नियोजन करणे महत्त्वाचे ठरत आहे.
यावर्षी पुणे जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये अत्यल्प प्रमाणात पाऊस झाल्यामुळे लवकरच पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्याचा परिणाम म्हणजे धरण पूर्ण क्षमतेने भरली नव्हती. सध्या धरणातील पाणीसाठाची टक्केवारी कमी झाली आहे.
यामध्ये माणिकडोह 39.92 टक्केच पाणीसाठा शिल्लक असून येडगाव 62.63 टक्के, वडज 74.13, पिंपळगाव जोगे 52.47, डिंबे 68.4, विसापूर 45.63, चिलेवाडी 80.82, घोड 69.59 इतका पाणीसाठा शुक्रवार (दि.2) पर्यंत शिल्लक आहे.
भविष्यात पाण्याचे नियोजन होणे महत्त्वाचे असून अन्यथा तीव्र पाणीटंचाईचा सामना नागरिकांना व शेतकर्यांना करावा लागणार आहे. पाण्याचे योग्य नियोजन होणं अपेक्षित आहे, अन्यथा शेतकर्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागेल, असे चित्र सद्या तरी दिसत आहे.