आंबेगाव तालुक्यात रब्बी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव
लाखणगाव – आंबेगाव तालुक्यात सध्या वातावरणात होत असलेला बदलामुळे सकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात धुके पसरत आहे. आणि या धुक्याचा परिणाम शेती पिकांवर झाला असून रोगराईत वाढ झाली आहे. त्यामुळे एकंदरीत शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे.
सध्या सर्वच ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळी पावसाचा फटका शेती पिकांना बसला असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. तर वाचलेली शेती पिके सध्या पडत असलेल्या धुक्यामुळे व रोगराईमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
एकंदरीतच अवकाळी पावसातून थोडी बहुत वाचलेली शेती पिके धुके व आलेल्या रोगराईत नष्ट होणार आहे. याचा तोटा शेतकर्यांना होणार असून शेतकर्यांचे सध्यातरी पडत असलेल्या धुक्यामुळे पडत असलेली रोगराई शेतकर्यांसाठी डोकेदुखी ठरत असून मोठ्या प्रमाणात फवारणी करताना सध्या शेतकरी आढळून येत आहे.
एकंदरीतच झालेला अवकाळी पाऊस त्यानंतर पडत असलेले धुके व या धुक्यानंतर येणारी रोगराई या संकटात शेतकरी सापडला असून मोठे नुकसान होताना पाहावयास मिळत आहे.
पिकांची नुकसानभरपाई कशी होणार?
शेतकरी वर्ग अडचणीत सापडला असून शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाने शेती पिकांची पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याचे जाहीर केले आहे; परंतु पावसानंतर आलेले धुके आणि वातावरणातील बदलामुळे पडणार्या रोगामुळे नष्ट झालेल्या शेती पिकांचे पंचनामे होणार का या शेती पिकांची नुकसानभरपाई कशी होणार, याबाबत मात्र कोणीच बोलत नाही.