नारायणगाव : मांजरवाडी (ता. जुन्नर) येथे मावळ तालुक्यातील आंबी येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषिदूत अनुराग वानखडे, अथर्व देशमुख, केशव गोगडे, हर्षण चौधरी, तपन जैन यांनी शेतकर्यांना ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत माती परीक्षण प्रात्यक्षिके करून दाखविले.
मांजरवाडी परिसरातील शेतकर्यांमध्ये माती परिक्षणाची जनजागृती व्हावी यासाठी उपक्रम राबविण्यात आला.
उपक्रमासाठी महविद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. भाग्योदय खोब्रागडे, समन्वयक डॉ. अविनाश खरे व डॉ. सचिन कंकाल यांचे मार्गदर्शन लाभले. माती परिक्षण करण्यासाठी शेतातील पिके काढल्यानंतर, पेरणीपूर्वी, रासायनिक खते देण्यापूर्वी किंवा खते दिल्यावर तीन महिन्यांतर मातीचा नमुना घेऊन माती परिक्षणानुसार खत व्यवस्थापन करावे, असा सल्ला कृषिदूतांनी शेतकर्यांना दिला.
प्रशिक्षणात शेतीतील नमूने गोळा करून त्याचे परीक्षण करण्यात आले. कृषी दुतांनी मातीमध्ये असणारे घटक, जमीनीची क्षमता, मातीचा प्रकार या विषयी शेतकर्यांना मार्गदर्शन केले.