मंचर – पन्नास वर्षांपूर्वी शिक्षण हे साक्षरतेवर भर देणारे होते. आज रोजगार मिळवण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे ठरत असून, त्यासाठी कौशल्यपूर्ण शिक्षण देण्याची गरज ओळखून रयत शिक्षण संस्थेने वाटचाल केली आहे.
देशात प्रादेशिक, भाषिक, धार्मिक, जातीय, आरक्षणाचे प्रश्न आहेत. त्यातून राष्ट्रीय एकात्मतेला तडा जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी तरुणांनी पुढे येणे काळाची गरज आहे, असे मत सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.
मंचर (ता. आंबेगाव) येथील रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब आवटे कॉलेजमध्ये पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना वळसे पाटील बोलत होते. यावेळी शरद बॅंकचे अध्यक्ष देवेंद्र शहा, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील, प्रमुख वक्ते डॉ. काशिनाथ सोलंकर, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य देवेंद्र शहा, कामगार नेते बाळासाहेब बाणखेले,
ऍड. बाळासाहेब पोखरकर, वसंतराव बाणखेले, डॉ. मोहन साळी, जगदीश घिशे, सचिन बांगर, बाजीराव मोरडे, मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे, सोमशेखर शेटे, डॉ. चैत्राली मोरे, प्राचार्य बाळासाहेब गार्डी, अरुण लोंढे, सेवानिवृत्त प्राचार्य इंद्रजीत जाधव उपस्थित होते. प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य डॉ. बाळासाहेब गार्डी यांनी केले. प्राचार्य उत्तम आवारी यांनी आभार मानले.