जेजुरी नगरपरिषदेला निवेदन : शिष्टमंडळ आग्रही
जेजुरी/ बारामती – जेजुरी येथील बंगाळी मैदान हे नगरपालिकेच्या ताब्यात असून त्या ठिकाणी सध्या शासनाच्या वतीने त्या ठिकाणी बांधकाम करण्याचे प्रयोजन आहे. परंतु सामाजिक अस्मितेच्या निगडीत असलेल्या मैदानावर भटक्या विमुक्तांच्या भावना जोडलेल्या गेलेले आहेत. यामध्ये भटक्या विमुक्तांसाठी धर्मशाळा, सामाजिक भवन तयार करण्यात यावे अशी मागणी शिष्टमंडळाने करावी, हे मैदान समाजासाठी मुक्त करावे, अशी मागणी करण्यात आली.
भटक्या विमुक्तांचे श्रद्धास्थान जेजुरीच्या खंडेराया व भटक्या विमुक्तांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेजुरीमध्ये वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा पिढ्यानपिढ्या त्या ठिकाणी भरत असलेला गाढवांचा बाजार व भटक्या विमुक्त्यांची न्याय प्रक्रिया त्या ठिकाणी चालत होती. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात या ठिकाणाहून अनेक व्यापारी गाढवांचा बाजार या ठिकाणी भरत असल्यामुळे येत असतात. या ठिकाणी वर्षातून एकदा भटक्या विमुक्तांचा मेळावा भरत असतो.
जानेवारी महिन्या मधल्या पौष पौर्णिमेदिवशी भंगाळे मैदान याठिकाणी जेजुरीमध्ये हा मेळावा जमत असतो. त्याठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन केले जाते. यामध्ये कुस्त्या रोटी बेटी व्यवहार मुलांची लग्न जमवण्याचे विषय या समाजामध्ये घडत असतात. बंगाळी मैदान हे नगरपालिकेच्या ताब्यात आहे. त्या ठिकाणी सध्या शासनाच्या वतीने त्या ठिकाणी बांधकाम करण्याचे प्रयोजन आहे. परंतु सामाजिक अस्मितेच्या निगडीत असलेल्या मैदानावर भटक्या विमुक्तांच्या भावना जोडलेल्या गेलेले आहेत. यामध्ये भटक्या विमुक्तांसाठी धर्मशाळा, सामाजिक भवन तयार करण्यात यावेत, अशी मागणी शिष्ठामंडळाने करावी, अशी मागणी केली.
यावेळी यशवंत ब्रिगेड, जय मल्हार क्रांती संघटना, वैदू समाज यांच्या वतीने जेजुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी ॲड. प्रियदर्शनी कोकरे, जयमल्हार क्रांती संघटनेचे प्रवक्ते विष्णू चव्हाण, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख देवेंद्र बनकर, यशवंत ब्रिगेडचे अध्यक्ष बापूराव सोलकर, संतोष खोमणे, भाजप उपाध्यक्ष विजय पवार, चंद्रकांत घोरपडे, रसूल शिंदे, रामभाऊ शिंदे, खंडू जाधव, प्रदीप जाधव पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यात दोन ठिकाणी जागा ठेवा
महाराष्ट्रात दोन ठिकाणी अशा प्रकारचा बाजार भरतो. त्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये मढी व पुणे जिल्ह्यामध्ये जेजुरी याबाबत लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. भटक्या विमुक्तांच्या पंढरीमध्ये या लोकांसाठी आरक्षित जागा असावी याबाबत शासनाला पाठपुरावा करण्यात येणार आहे. त्याबाबतची कार्यवाही करण्याचे बैठकीमध्ये ठरले.