आळंदी -आळंदीचा कार्तिकी वारी सोहळा कसा साजरा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन सोहळ्याला परवानगी देण्यात आली.
मात्र, केवळ 50 जणांच्या उपस्थितीतच हा सोहळा साजरा करण्याची अट घातली आहे. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने या सोहळ्यास परवानगी दिली आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा यावर्षी 725 वा संजीवन समाधी सोहळा आहे. हा सोहळा दि. 6 डिसेंबर ते 14 डिसेंबर दरम्यान पार पडणार आहे. केवळ 50 व्यक्तींच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा करण्यास शासनाने परवानगी दिली आहे.
कोविड 19 संदर्भातील केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याच्या अटींवर मर्यादित स्वरूपात हा सोहळा साजरा करण्यास परवानगी देण्यात आली आहे.