युवासेनेची मागणी : मुठा खोर्यातील ग्रामस्थ चिंतेत
पिरंगुट – मुळशी तालुक्यातील टेमघर धरणातील पाणीसाठा पाहता मुठा खोर्यातील ग्रामस्थ चिंतेत आहे. त्यामुळे टेमघर धरणातील पाणीसाठा हा मुठा खोर्यातील विभागातील गज्ञवाकरिता राखीव ठेवावा, अशी मागणी शिवसेना युवासेनेचे उपजिल्हाधिकारी अमित कुडले यांनी केली आहे.
या विभागातून मुठा नदी वाहते या नदीचा काठावर बरीच गावे आहेत. या विभागात मोठ्या प्रमाणात ऊसशेती केली जात असून दुग्ध व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात आहे. पालेभाज्या देखील मोठ्या प्रमाणत केली जाते. पिण्याचा पाण्याचा देखिल टेमघर धरण हाच मोठा स्त्रोत आहे.
रात्रीचा वेळी मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जाते. तसेच फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे हे चार महिने बाकी आहेत. याबाबत विभागाने खबरदारी घ्यावी अन्यथा ठिय्या आंदोलन करण्यात यईल अशा इशारा उपजिल्हा संघटक सचिन दगडे शिवाजी ऊभे,
तानाजी हाळदे, लहू तिकोने, माऊली साळेकर, समीर शिंदे, राणी शिंदे, श्याम येनपूरे, सार्थक दिघे, आकाश भरेकर, ओंकार मारणे अमित मारणे, धनजंय पासलकर, यांच्या वतीने इशारा देण्यात आला आहे.