पुणे – वेगवेगळया गंभीर ११ गुन्हयात फरार असलेला आणि पुणे जिल्हा न्यायालयाकडून फरार घाेषित करण्यात आलेला अॅड.सागर मारुती सुर्यवंशी यास राज्य गुन्हे अन्वेष्ण पथकाने (सीआयडी) शुक्रवारी रात्री पुण्यातील शुक्रवार पेठेतून अटक केले.
अॅड.सागर सुर्यवंशी विराेधात प्रामुख्याने फसवणुकीच्या तक्रारी दाखल असून शिवाजीनगर, पिंपरी, भाेसरी एमआयडीसी, नवघर पाेलीस ठाऱ्यात संबंधित गुन्हे दाखल आहे. पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाने सुर्यवंशी यास फरार घाेषित करतानाच सीआयडीला ताे मागील तीन वर्षापासून का मिळून येत नाही असे म्हणत कानउघडणी केली हाेती. त्यानंतर सीआयडीचे पथकाने याबाबत गांभीर्याने दखल घेत सुर्यवंशी याचा तपास सुरु केला हाेता.
सुर्यवंशी हा पुण्यातील शुक्रवार पेठेतील रेणुका मातेचा भक्त असल्याने ताे नवरात्रीमुळे शुक्रवारी रात्री दहा वाजता मंदिरात येणार असल्याची माहिती सीआयडीचे पथकास मिळाली हाेती. त्यानुसार पाेलीसांनी वेशांतर करुन सापळा रचत त्यास अटक केली. याबाबतचा तपास सीायडीचे पाेलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचे पथक करत आहे.