कात्रज, आंबेगाव परिसर पुणे शहराच्या दक्षिणेची वेस समजला जातो. त्यामुळे या वेशीवरच येऊन अनेक जण थबकतात. तसेच, याच भागातून महामार्ग जात असल्याने या भागात सिग्नलवर वस्तू विकणारी, भिक मागणारी अर्थातच शाळाबाह्य (?) मुले आढळून येण्याचे प्रमाण मोठे आहे. शासनाकडून प्ररत्येकाला शिक्षण मिळेल, अशी सुविधा निर्माण केलेली असताना अशी मुले शिक्षणापासून वंचीत का राहतात. शासनाच्या सर्वेक्षणात या मुलांना शाळाबाह्य गणले जात नाही का? यांच्या शिक्षणाला लागलेला “रेड’ सिग्नल कधी सुटणार? असे प्रश्न उपस्थित राहत आहेत.
करोना कालावधीत रस्ते ओस पडले असताना सिग्नलही बंदच होते. याच कारणातून कात्रज, आंबेगाव परिसरातील सिग्नलवर छोट्या-मोठ्या वस्तूंची विक्री करून गाड्यांवर फडकी मारत पैशांसाठी हात पुढे करणाऱ्या मुलांनीही आपापले गाव गाठले होते. आता, अनलॉकनंतर रस्ते गजबजले, वाहतूक कोंडी होऊ लागली. सिग्नलही सुरू झाले आणि पुन्हा चिमुकली मुलं आपापल्या कामाला सरसावली. करोनामुळे सर्वांनाच आर्थिक फटका बसलेला आहे. यात ही गरीबा घरची पोरंही पोळली गेली. आता, एक-एक रुपया कमविण्यासाठी ती उन्हातान्हात सिग्नलवर राबत आहेत.
कात्रज, आंबेगाव परिसरात सिग्नलवर लहान मुले काहीना काही तरी विकताना तसेच भिक मागताना दिसतात. अशा मुलांचे शिक्षणाचे काय? ही मुले या ठिकाणी येतात कुठून? मुलं हरवली असल्याच्या घटनांबाबतच्या बातम्या आपण वाचतो तर मग, ही हरवलेली मुलं तर नाहीत ना? सिग्नलवर वस्तू विकायला लावणे, भिग मागायला लावणे हा धंदा त्यांच्याकडून कोणी करून घेत आहे का? पोलिसांची या मागची भूमिका काय? असे अनेक प्रश्न उपस्थित राहत आहेत.
यातही ही मुलं खरोखरच गरीबाची असतील तर मग यांच्या शिक्षणाचे काय? शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करताना या मुलांची मोजदादा होते का? शासनाच्या शालेय विभागाकडून 1 ते 10 मार्च या कालावधीत पुणे महापालिका शहर हद्दीतील शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण झाले यामध्ये अडीच हजारापेक्षा जास्त मुले शाळाबाह्य सापडली. त्यांना शासनाच्यावतीने शिक्षणाच्या प्रवाहात आणले जाईल. परंतु, सिग्नलवर वस्तू विकणाऱ्या, भिक मागणाऱ्या मुलांचे काय? खंर तर या मुलांच्या भविष्याचा प्रश्नच गुंतागुंतीचा आहे. करोनाच्या काळात स्थित्यंतरे झाल्यानंतर यातूनच बेरोजगारीचे प्रमाणही वाढले. अर्थाजनाच्या समस्या उभ्या राहिल्या. आर्थिक समस्यांनी बेजार झालेली कुठुंब पुन्हा शहराकडे वळली असली तर रस्त्यालगत, आडोशाला कोप्या टाकून राहणाऱ्या कुटुबांतील मुले भीक मागू लागली. याच कारणातून शहर, उपगरांतील सिग्नलवर अशी मुले आता मोठ्या संख्येने दिसू लागली आहेत. शाळाबाह्य विद्यार्थी असे उपक्रम हाताळताना राज्य शासनाने तसेच पालिकेकडूनही अशा मुलांकडे लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे.
कात्रज, आंबेगाव परिसर पुणे शहराच्या दक्षिणेची वेस समजला जातो. त्यामुळे या वेशीवरच येऊन अनेक जण थबकतात. तसेच, याच भागातून महामार्ग जात असल्याने या भागात सिग्नलवर वस्तू विकणारी, भिक मागणारी अर्थातच शाळाबाह्य (?) मुले आढळून येण्याचे प्रमाण मोठे आहे. शासनाकडून प्ररत्येकाला शिक्षण मिळेल, अशी सुविधा निर्माण केलेली असताना अशी मुले शिक्षणापासून वंचीत का राहतात. शासनाच्या सर्वेक्षणात या मुलांना शाळाबाह्य गणले जात नाही का? यांच्या शिक्षणाला लागलेला “रेड’ सिग्नल कधी सुटणार? असे प्रश्न उपस्थित राहत आहेत.