पुणे -देशातील कारखान्यांनी गेल्या काही वर्षांत अनावधानाने संकलित केलेली विस्फोटके सुरक्षितरीत्या निष्क्रिय करण्यासाठी लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फेर् विस्फोटक मुक्त बंदरगाह’ हे अभियान राबविण्यात आले. त्याअंतर्गत मुख्यालयाच्या अखत्यारीत असलेल्या प्रदेशामधून सुमारे 1600 टन विस्फोटके सुरक्षितरीत्या निष्क्रिय करण्यात आली.
संरक्षण मंत्रालयाच्या निर्देशानुसार भारतीय सैन्याने हे अभियान सुरू केले. दक्षिण मुख्यालयातर्फे रराबविण्यात आलेल्या या अभियानांतर्गत मुंबई, गुजरात, कानपूर, जयपूर आणि जोधपूर या ठिकाणी कारखान्यात अनावधनाने गोळा केलेला 1600 टन दारूगोळा संकलित करण्यात आला.
मध्यवर्ती दारूगोळा डेपो, पुलगाव येथील विशेष बॉम्ब डिस्पोजल टीमला सैन्य दलातर्फे नियुक्त करण्यात आले. दारूगोळा सर्वेक्षण आणि विल्हेवाट लावण्यासाठी विविध ठिकाणी ही टीम पाठविण्यात आली. सैन्याच्या विशेष पथकाने हे स्फोटके संबंधित शहराच्या हद्दीबाहेरील सुरक्षित ठिकाणी नेले आणि टप्प्याटप्प्याने सुरक्षितपणे निष्क्रिय केले. एकट्या मुंबईत सुमारे दोन हजार किलो आरडीएक्स/टीएनटीच्या एकूण स्फोटक सामग्रीसह 8 लाख किलो अज्ञात स्फोटक वस्तू (यूएक्सओ)ने विल्हेवाट लावण्यात आले.
यापूर्वी मार्च 2021 मध्ये तमिळनाडूच्या तिरुवल्लूर जिल्ह्यात सदर्न कमांडने अशीच कारवाई केली होती. तेथे चेन्नईपासून 43 कि.मी. अंतरावर असलेल्या गुम्मिडेपुंडी आणि आसपासच्या सर्व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विस्फोटके सुरक्षितरीत्या निष्क्रिय करण्यात आली. या कार्यात आव्हाने व धोके असूनही लष्कराच्या स्फोटक तज्ञांनी ही कामे प्रेरणा व दृढनिश्चयाने हे कार्य पार पाडले.