पुणे – राज्य शालेय शिक्षण विभागाकडून काही महिन्यांपूर्वी शाळाबाह्य बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात राज्यात ३ हजार १७८ शाळाबाह्य बालके आढळली. यातील १ हजार ८०७ बालकांना शाळेपर्यंत आणण्यात यश आले. तर, सुमारे १ हजार ३७१ बालके अजूनही शिक्षणाच्या प्रवाहाबाहेरच राहिली आहेत.
शालेय शिक्षण विभागाकडून दरवर्षी शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित बालकांचे सर्वेक्षण करण्यात येते. यंदाच्या शैक्षणिक वर्षात दि. १७ ते ३१ ऑगस्ट २०२३ दरम्यान हा सर्व्हे झाला. त्या अहवालानुसार राज्यात पालघर जिल्ह्यात सर्वाधिक ९२८ बालके शाळाबाह्य आढळली. यातील १६५ बालके शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात आलेली आहेत तर ७६३ बालके शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेरच आहेत. पुणे जिल्ह्यात २८९ शाळाबाह्य बालके आढळली. ही सर्व बालके शिक्षणाच्या प्रवाहात सहभागी करुन घेण्यात आली, असा दावा शिक्षण विभागाने केला आहे.
बालके शाळाबाह्य असल्याची कारणे
दिव्यांग बालक, कामासाठी पालकांचे स्थलांतर, पालकांची उदासीनता, बालमजुरी, परिसरात अंगणवाडी नसणे, पालकांची आर्थिक परिस्थिती, माध्यमिक शाळा जवळपास नसणे, पालकांशी संपर्क न होणे, बालक पालकांसोबत न सांगता निघून जाणे.
जिल्हानिहाय शाळाबाह्य बालके
अहमदनगर – २२, अकोला- ५१, अमरावती – ७, औरंगाबाद – ६२, भंडारा – २, बीड – २९, बुलढाणा – ४३७, चंद्रपूर – ००, धुळे – ९७, गडचिरोली- १११, गोंदिया- ६३, हिंगोली – १२, जळगाव- ४८, जालना – ७, कोल्हापूर – ००, लातूर- ०५, मुंबई उपनगर – १७६, मुंबई उत्तर – ६०, मुंबई दक्षिण- ५३, मुंबई पश्चिम – ६७, नागपूर- ४६, नांदेड- ००, नंदुरबार- ३०, नाशिक – ६७, उस्मानाबाद- ०३, पालघर- ९२८, पुणे – २८९, रायगड- ३८, रत्नागिरी – ००, सांगली – ००, सातारा – १४, सिंधुदुर्ग – १३, सोलापूर – ५, ठाणे – ३८०, वर्धा – २०, वाशिम – ००, परभणी – ०६, यवतमाळ – ३०.