राजगुरूनगर, (प्रतिनिधी)- हुतात्मा राजगुरू शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरसेनापती हंबीरराव मोहिते विधी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिर ’लोकसंख्या नियंत्रण जनजागृती’ उपक्रमांतर्गत युवकांचा ध्यास ग्रामशहर विकास या शिर्षकाखाली मांजरेवाडी (पिंपळ, ता. खेड) येथे संपन्न झाले.
हुतात्मा राजगुरू शिक्षण प्रसारक मंडळाचे सरसेनापती हंबीरराव मोहिते विधी महाविद्यालय, राजगुरूनगर आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विषेश श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन संस्थेच्या खजिनदार सुरेखाताई मोहिते पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. शिवाजीराव मोहिते व मांजरेवाडीच्या सरपंच अनिता मांजरे, उपसरपंच अजिंक्य मांजरे कार्यक्रम अधिकारी प्रा. नीलिमा फोकमारे-पाटील, प्रा. योगेंद्र चौधरी, प्रा. कविता बालघरे, प्रा. सिद्धेश्वर काशिद, प्रा. संदीप तायडे, प्रा. किरण काळे, प्रा. श्रद्धा सोनारीकर, प्रा. ज्योती बच्चे, पार्वती शिंदे यांच्यासह मांजरेवाडी ग्रामस्थ, महाविद्यालयांचे प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या शिबिरामध्ये महाविद्यालयातील 45 विद्यार्थी सहभागी झाले होते. मांजरेवाडीतील शाळा, ग्रामदैवत मंदिरे, सुषोभिकरण, मंदिर दुरूस्ती, परिसर रंगरंगोटी, ग्रामसर्वेक्षण, ग्रामदैवत धर्मराय देवस्थान व हनुमान मंदिर इतिहास अवलोकन व तेथील पारंपरिक प्रथा व रूढी परंपरा याची कायद्याच्या अनुषंगाने विशेष माहिती आत्मसात केली. सर्व स्वयंसेवकांनी आणि ग्रामस्थांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदवला.
यावेळी संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. शिवाजीराव मोहिते, रत्नाई महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. किशोर भागवत उपस्थित होते. हे विषेश श्रमसंस्कार शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सरसेनापती हंबीरराव मोहिते महाविद्यालयाच्या प्राचार्य तथा कार्यक्रम अधिकारी प्रा. नीलिमा फोकमारे – पाटील, प्रा. सिद्धेश्वर काशिद, प्रा. संदीप तायडे, महाविद्यालयांचे प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी विषेश सहकार्य केले.
व्याख्यानांतून जनजागंती
या शिबिरामध्ये ग्रामस्थ आणि स्वयंसेवकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विशेष उपक्रम म्हणून प्रत्येक दिवशी विविध विषयांवर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. अंधश्रध्दा निर्मुलन’, ’ लोकसंख्या नियंत्रण जनजागृती उपक्रम अंतर्गत युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास’, ‘हुंडाबळी’, ’बालविवाह प्रतिबंध’, ’किरकोळ तंट्यांमध्ये लोकन्यायालयाचा वापर कसा करावा’, ‘स्त्रीभ्रूण हत्या’ यांसारख्या विषयांवर जनजागृती केली. समारोप प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष बबनराव डांगले यांच्या अध्यक्षातेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.