राहाता -साई मंदिराला केंद्र शासनाची सुरक्षा न देता राज्य शासनाची सुरक्षा पुरवावी, साई मंदिराची सुरक्षा करण्यास सध्याचे पोलीस दल समर्थ आहे. या मंदिरात सीआयएसएफची सुरक्षा व्यवस्था तैनात करू नये, अशी मागणी भाजपचे नेते डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या मागणीस सहमती दर्शवत फडणवीस यांनी याबाबत राज्य सरकार आपली भूमिका योग्य ठिकाणी मांडेल, असे आश्वासन दिले.
डॉ.पिपाडा म्हणाले, साई मंदिराला सध्याची पोलीस दलाची सुरक्षा पुरेशी आहे. सध्याच्या व्यवस्थेत आणखी सुधारणा करायची असल्यास पोलीस ट्रेनींग सेंटरमधून बाहेर पडणाऱ्या पोलीस दलातील जवानांची सुरक्षा व्यवस्था तैनात करण्याचा पर्याय सरकार समोर आहे. सीआयएसफची सुरक्षा येथे तैनात करू नये. येथे भाविकांच्या भावना समजून घेऊन कार्यरत असलेली सुरक्षा व्यवस्था तैनात असायला हवी. सीआयएसफ सुरक्षा व्यवस्था तैनात केल्यास भाविकांना त्याचा जाच सहन करावा लागेल.