पुणे – राज्यात एक नोव्हेंबरला सुरू झालेल्या साखर हंगामात आतापर्यंत केवळ आठ लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून, मागील वर्षीच्या हंगामातील पहिल्या तेवीस दिवसांत सुमारे चौदा लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. त्या तुलनेत यंदाच्या साखर उत्पादनात सहा लाख टनांची घट झाली असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान आतापर्यंत 76 सहकारी व 78 खासगी असे एकूण 154 कारखान्यांचेच गाळप सुरू झाले असून, त्यातून आठ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे, तर सरासरी साखर उतारा 7.61 टक्के मिळाला आहे. यंदा पावसाने ओढ दिल्याने राज्यातील ऊस गाळप हंगामास विलंब झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंत्री समितीने एक नोव्हेंबरपासून साखर कारखान्यांना ऊस गाळप करण्याचा परवाना दिला. परंतु, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे कोल्हापूर व सांगलीतील काही साखर कारखाने अद्याप सुरू होऊ शकलेले नाहीत.