रोज हजारावर वाहनांच्या फेऱ्या रद्द
पुणे – पूरस्थितीमुळे मुंबईहून सातारा, सांगली, कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्राबरोबर कोकण आणि गोव्याकडे जाणाऱ्या दररोजच्या सुमारे एक हजार खाजगी बसेसच्या फेऱ्या सोमवारपासून रद्द आहेत. त्यामुळे, प्रवाशांना मुंबईहून गावी जाण्यासाठी कोणताच मार्ग राहिलेला नाही. पूर ओसरेपर्यंत सेवा बंद राहतील, असे खाजगी बस मालकांकडून सांगितले जात आहे.
पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात जाणाऱ्या सर्व खासगी वाहने मागील पाच दिवसांपासून रद्द करण्यात आलेली आहेत. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्ग सध्या बंद आहेत. सोमवारपासून खासगी बसेस बंद असल्याने मुंबईहून कोल्हापूर, सातारा, सांगलीला जाणारी वाहने पुण्यापर्यंत चालविण्यात येत आहेत. यामुळे मुंबईतील प्रवासी मोठ्या संख्येने अडकून पडल्याचे चित्र आहे.