Lok Sabha Election 2024 – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ आपल्या जवळच्या श्रीमंत उद्येागपतींसाठीच काम करतात, त्यांना बाकीच्यांशी काही देणेघेणे नाही अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे. ते म्हणाले की ‘मोदी हे केवळ या उद्येागपतींचे एक हत्यार आहे.
मोदींचे काम केवळ देशातील खऱ्या मुद्द्यांपासून लोकांचे लक्ष विचलित करणे, भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींचे संरक्षण करणे आणि त्यांची बँक कर्जे माफ करणे एवढेच आहे’ असे ते म्हणाले.
मोदींनी देशातील २० ते २५ उद्योगपतींचे सुमारे १६ लाख कोटी रुपये माफ केले आहेत. परंतु देशातील शेतकरी, बेरोजगारी किंवा महागाई या समस्यांबद्दल ते बोलत नाहीत, आणि या मुद्द्यांकडे लक्ष देण्यास त्यांना वेळही नाही असे ते म्हणाले.
राहुल गांधी यांनी कोझीकोडे जिल्ह्यातील कोडियाथूर येथे रोड शो आयोजित केला होता. त्यावेळी उपस्थित समुदायासमोर ते बोलत हेाते. इलेक्टोरल बाँड्सच्या मुद्द्यावर ते म्हणाले की हे इलेक्ट्रोरल बाँड म्हणजे केवळ मोदींच्या खंडणीचा एक प्रकार आहे.
राहुल गांधी यांच्या या रोड शोला मोठा प्रतिसाद मिळाला. एसयुव्ही गाडीच्या टपावर बसून त्यांनी उपस्थितांना अभिवादन केले. त्यांना भेटण्यासाठी जी गर्दी झाली त्यात महिलांची संख्याही लक्षणीय होती.
.