मुंबई – महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेत आता महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या विशेष सर्वसाधारण बैठकीत महिलांचा सहभाग वाढवण्याच्या निर्णयावर एकमत झाले असून, त्यासाठी आवश्यक असलेल्या संघटनेच्या घटना दुरुस्तीला मंजुरी देण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
याआधी प्रत्येक जिह्यातून तीन सदस्य राज्य संघटनेवर पाठवले जात असे. आता ही संख्या चारपर्यंत करण्यात आली आहे. तसेच चार सदस्यांपैकी एक महिला असणे अनिवार्य असणार आहे.