पुणे – दुर्दैव आहे एका बाजूला आपला बळीराजा संकटात आहे आणि दुसऱ्या बाजूला फटाके वाजवणे जंगी स्वागत करणं त्यामुळे ही शेतकऱ्याची चेष्ठा आहे. अशी टीका आज विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर केली आहे.
प्रवीण दरेकर पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, शेकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम होत आहे. सरकारने संवेदनशीलपणे वागायाला हवं परंतु याठिकाणी सरकार संवेदनहीन दिसतंय असे भाष्य विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज केले आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, महाविकास आघाडीची ठरलेली भूमिका आहे. काही झालं की केंद्रकडे मदत मागायची आणि मोकळं व्हायचं आता पर्यंत 1500 कोटींच्या आसपास वेगवेगळी केंद्राने मदत केली आहे आणि अजूनही केंद्राकडे आम्ही मदतीची मागणी करू याबाबत दुमत असायचे कारण नाही.
केंद्राने मदत केलीच पाहिजे आम्ही आग्रही मागणी करू परंतु केंद्राकडे बोटं दाखवून आपल्या जबादाऱ्या पासून राज्य सरकारला दूर पळता येणार नाही. केंद्र आणि राज्य असा संघर्ष निर्माण करायचा त्यामुळे काही झालं की केंद्राकडे बोट दाखवायचं आणि लोकांचं मत दुसरीकडे वळविण्याचा हा पर्यंत आहे. त्यामुळे केंद्राकडे बोट दाखवायचं राजकारण बंद करा आणि शेतकरी व लोकांना मदत करा असे दरेकर आजच्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले आहेत.