Prakash Ambedkar On BJP EVM : भाजप ईव्हीएमशिवाय ४०० पार होणार नाही. म्हणून ईव्हीएम हॅकिंग थांबवण्याच्या दृष्टिकोनातून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी मुंबई येथे पत्रकार परिषद घेतली.
व्हीव्हीपॅट पावती ही मतदारांच्या हातात आली पाहिजे आणि व्हेरीफाय झाली पाहिजे. मगच त्याने ती बॅलेट बॉक्समध्ये टाकावी. यासाठी आम्ही निवडणूक आयोगाला भेटणार आहोत. ईव्हीएमची मोजणी झाल्यानंतर निकाल घोषित करणे अपेक्षित असते. | Prakash Ambedkar On BJP EVM
या नंतर व्हीव्हीपॅटची पुन्हा मोजणी मागितली असेल, तर त्याचा निकाल हा अंतिम निकाल असेल. याची अंमलबजावणी झाली पाहिजे, यासाठी निवडणूक आयोगासमोर याचा आग्रह होत असल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले. | Prakash Ambedkar On BJP EVM
आंबेडकर पुढे म्हणाले की, मला १९८५ च्या निवडणुकीचा अनुभव आहे. तेव्हाची निवडणूक ही बॅलेट पेपरवर होती. १९८९ ची निवडणूक सुद्धा बॅलेट पेपरवर झाली. बॅलेट पेपरवरील मतदान मोजायला १५ दिवस लागतील, असे नव्या पिढीला सांगितले जाते हा चुकीचा प्रचार आहे असे मी मानतो. त्यावेळेस मतदान संपले की, दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू झाली तेव्हा रात्री १२ च्या आधी निकाल यायचा, असेही आंबेडकरांनी स्पष्ट केले. | Prakash Ambedkar On BJP EVM
“मला शरद पवार म्हणतात, हे विसरू नका. मी त्या वाटेने..” भर सभेत पवारांचा दादा गटातील आमदाराला इशारा
राष्ट्रवादीला किती जागा मिळणार ? अजित पवार म्हणतात,”जागावाटपाचा निर्णय..”