आपल्या भागातील समस्या, प्रश्न आम्हाला पाठवा…, आम्ही त्याला योग्य प्रसिद्धी देऊ. “प्रभात’च्या माध्यमातून सुरू झालेला जनसंवाद प्रशासन जागे होईपर्यंत सुरूच राहील…
काळेपडळ
काळेपडळ येथील रेल्वेलाईन खाली असणाऱ्या भुयारी मार्गात पाणी साचले आहे, ते काढून दोन्ही बाजूकडील रस्त्यावर मुरूम टाकून रस्ता व्यवस्थित करण्यात यावा. काळेपडळ रेल्वे गेटवरील वाहतुकीचा ताण कमी होईल व नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल.
स्वप्निल डांगमाळी – 7559124199
कात्रज चौक
पुणे-सातारा रोडवरील भारती विद्यापीठ चौक, कात्रज दूध डेअरी चौक, कात्रज भाजी मंडई चौक, किनारा हॉटेल चौकात वाहतूक कोंडीसारख्या समस्या कात्रजकरांसाठी कामच्याच झाल्या आहे का? असा प्रश्न, पडत आहे. या ठिकाणी मोठ्या शिक्षण संस्था असून विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे.
अशोक कोंडे – 9822973877
नारायण पेठ
गोगटे प्रशालेच्या शेजारील गल्लीमधील पालिकेच्या कलावतीबाई मावळे दवाखान्यासमोर एक ड्रेनेजचे झाकण खचले आहे. रस्त्याच्या मधोमध असल्याने यात अनेक वाहने अडकून पडत आहेत.चारचाकी वाहन अडकले तर ते काढणेसुद्धा अवघड होते. परिणामी, गल्लीमध्ये वाहतूक कोंडी होत आहे. अरुंद गल्ली त्यातच खचलेले ड्रेनेजचे झाकण यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
डॉ.अधीर तांदळे – 9422404800
दिव्यांगाच्या तोंडाला पुसली पाने…
देशातील सर्वात दुर्लक्षित घटक म्हणजेच दिव्यांग बांधव देशात आज महाराष्ट्राचा तिसरा नंबर लागतो. केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थ संकल्पात दिव्यांगाना कोणत्याही प्रकाराची सुख-सुविधा देण्यात आल्या नाहीत. देशात आज आर्थिक मंदीची लाट आहे. दिव्यांग व्यक्तीचे पुनर्वसन आणि मिळणाऱ्या सुविधा याबाबत कोणतीही तरतूद दिसत नाही. वर्षानुवर्षे खितपत पडलेल्या दिव्यांगाचे पुनर्वसन कधी होणार?
ज्ञानेश्वर शिंदे – 8983153119
शिवशंभोनगर
शिवशंभोनगर गल्ली नं. 3अ या ठिकाणी कचऱ्याचे ढीग सर्रास पाहायला मिळत आहेत. भटक्या प्राण्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे तसेच डास, माशा व दुर्गंधी सुटली आहे. स्वच्छ पुणे अभियान कागदावर असून आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. मनपा आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
राहुल काळे – 9765782727