मुंबई – रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज सकाळी रायगड पोलिसांनी अटक केली आहे. 5 मे 2018 मध्ये इंटिरियर डिझानयर अन्वेय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामींवर कारवाई करण्यात आली आहे. नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्याआधी त्यांनी सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांचे नाव असून पैसे थकवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.
दरम्यान, आता या संपूर्ण प्रकारावरुन भाजपने राज्यातील ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजप नेते ‘नितेश राणे’ यांनी सुद्धा ट्विटवरून आपले मत व्यक्त केले आहे. “सत्ता आज आहे, उद्या नसेल… आज तुमची आहे… उद्या आमची असेल” या आशयाचे ट्विट नितेश राणेंनी केले आहे. मात्र, राणेंनी आपल्या ट्विटमध्ये कोणालाही मेन्शन केलेलं नाही, किंवा कोणाचं नावही घेतलेलं नाही.
“सत्ता आज है, कल नही… आज तुम्हारी है… कल हमारी होगी.. बस इतना याद रखना… हिसाब तो होगा.. इंटरेस्ट लगा के”
“Satta” aaj hai.. kal nahi..
Aaj tumhari hai..Kal Humhari hogi..
Bus itna yaad rakhna!
Hisaab toh hoga..interest laga ke 😊😊— nitesh rane (@NiteshNRane) November 4, 2020
दरम्यान, पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईवर रिपब्लिकने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पोलिसांनी घरात जबरदस्ती घुसखोरी करत अर्णब गोस्वामी यांच्यासोबत धक्काबुक्की केल्याचा दावा रिपब्लिकने केला आहे. कोणतीही अधिकृत कागदपत्रे नसताना आणि बंद झालेल्या केसमध्ये ही अटक झाल्याचा दावा रिपब्लिकने केला आहे.
.