मणिपूर – हिंसाचारग्रस्त मणिपूरला भेट देण्यासाठी आलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांना स्थानिक पोलिसांनी पुढे जाण्यापासून रोखले. राहुल गांधी यांना इंफाळ विमानतळासमोरील विष्णुपूर चेकपोस्टवर थांबवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षेच्या कारणास्तव राहुल गांधींचा ताफा थांबवण्यात आला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी ( गुरुवार ) आज इंफाळला पोहोचले. एएनआयच्या वृत्तानुसार, राहुल गांधी दोन दिवस हिंसाचारग्रस्त राज्याचा दौरा करणार होते आणि त्यांच्या दौऱ्यात ते मदत शिबिरांनाही भेट देणार होते. यासोबतच त्यांचा इंफाळ आणि चुरचंदपूर येथील नागरी समाजाच्या प्रतिनिधींना भेटण्याचा कार्यक्रम होता. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव राहुल गांधींचा ताफा थांबवण्यात आला आहे.
राहुल गांधींच्या दौऱ्याची माहिती देताना काँग्रेसच्या ट्विटर हँडलवर लिहिले होते, ‘तुमचे राहुल गांधी प्रेम, बंधुता आणि शांतीचा संदेश घेऊन मणिपूरला पोहोचले आहेत. काही वेळात तो हिंसाचार पीडितांना भेटेल.’ असेही त्यांनी लिहिले होते.