नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्याच्यावेळी समोर आलेल्या सुरक्षा त्रुटीबाबत सर्वोच्च न्यायालयामार्फत नेमण्यात आलेल्या समिती मार्फत चौकशी केली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधिशामार्फत ही चौकशी केली जाणार आहे.
या प्रकरणाची केंद्र सरकार आणि पंजाब सरकार या दोन्ही सरकारांच्या यंत्रणांमार्फत चौकशी केली जाणार होती परंतु या दोन्ही चौकश्या थांबवण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे.
या समितीवर पंजाब पोलिस चे वरीष्ट अधिकारी तसेच केंद्रीय तपास यंत्रणांच्या प्रतिनिधींचाही समावेश असणार आहे. समिती बाबतचा तपशीलवार आदेश नंतर जारी केला जाणार आहे.
शेतकरी निदर्शकांनी रस्ता अडवल्यामुळे पंतप्रधानांना आपली नियोजित सभा रद्द करून पंजाबातून परत जावे लागले होते. या प्रकरणात केंद्र व राज्य सरकारांनी परस्परांवर आरोप केले आहेत. त्यामुळे हा विषय देशभर गाजला होता.