PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सुरत डायमंड एक्सचेंजचे उद्घाटन केले. याला ‘सुरत डायमंड बोर्स’ असेही म्हणतात. ही इमारत आता जगातील सर्वात मोठे कार्यालय बनले आहे. यापूर्वी हा विक्रम पेंटागॉनच्या नावावर होतायावेळी बोलताना पंतप्रधानांनी, “आज सुरत शहराच्या वैभवात आणखी एका हिऱ्याची भर पडली आहे आणि हा हिराही छोटा नसून तो जगातील सर्वोत्तम आहे. तसेच “सुरत डायमंड बाजार हे मोदींच्या गॅरंटीचे उदाहरण आहे असेही त्यांनी म्हटले.
हे मोदींच्या हमीभावाचे उदाहरण आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूरत डायमंड बाजाराच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले. सुरत शहराच्या वैभवात आज आणखी एका हिऱ्याची भर पडली असून हा हिराही छोटा नसून तो जगातील सर्वोत्तम आहे. सुरत डायमंड बोर्स व्यतिरिक्त पीएम मोदींनी सुरत विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचेही उद्घाटन केले. टर्मिनल इमारत सर्वात व्यस्त असतानाही 1200 देशांतर्गत प्रवासी आणि 600 आंतरराष्ट्रीय प्रवासी हाताळण्यास सक्षम आहे.
सूरत डायमंड बोर्सची इमारत 67 लाख स्क्वेअर फूट पेक्षा जास्त क्षेत्रात पसरलेली आहे, जे जगातील सर्वात मोठे ऑफिस कॉम्प्लेक्स आहे. हे सुरत शहराजवळील खजोद गावात आहे. सुरत हे हिरे उद्योगासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आजकाल मोदींच्या गॅरंटीची चर्चा होत आहे. पाच राज्यांचे निवडणूक निकाल आल्यानंतर त्याचीच अधिक चर्चा होत आहे. येथील कष्टकरी जनतेने ‘मोदींच्या गॅरंटी’चे वास्तवात रूपांतर करताना पाहिले असून ‘सूरत डायमंड बर्से’ हेही या गॅरंटीचे उदाहरण आहे.” असे म्हणत त्यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले.
‘सुरत डायमंड बोर्स’ बद्दल बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ही इमारत भारतीय डिझायनर, भारतीय साहित्य आणि भारतीय संकल्पना यांच्या क्षमतांचे प्रदर्शन करते. ही इमारत नव्या भारताच्या नव्या ताकदीचे आणि नव्या संकल्पाचे प्रतीक आहे. ते म्हणाले की, सुरत एकेकाळी सन सिटी म्हणून ओळखले जात होते. इथल्या लोकांनी आपल्या मेहनतीने डायमंड सिटी आणि सिल्क सिटी बनवली आहे. आज सुरत हे लाखो तरुणांच्या स्वप्नांचे शहर आहे. आता सुरत आयटी क्षेत्रातही प्रगती करत आहे, असे त्यांनी म्हटले.
पंतप्रधान पुढे बोलताना मोदी म्हणाले, तुम्हा सर्वांना माहिती आहे की, गेल्या 10 वर्षांत भारत आर्थिक शक्तीमध्ये 10व्या क्रमांकावरून पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. आता मोदींनी देशाला खात्री दिली आहे की त्यांच्या तिसऱ्या डावात भारताचा जगातील टॉप-3 अर्थव्यवस्थांमध्ये नक्कीच समावेश होईल. पीएम मोदी म्हणाले की, आज आंतरराष्ट्रीय स्तरावर वातावरण भारताच्या बाजूने आहे. जगभरात भारताची प्रतिष्ठा शिखरावर आहे. जगभरात भारताची चर्चा होत आहे. ‘मेड इन इंडिया’ आता एक मजबूत ब्रँड बनला आहे.” असे त्यांनी यावेळी म्हटले.
पुढे नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांविषयी त्यांनी, “तीन राज्यात सरकारे स्थापन केली आहेत, तेलंगणातही भाजपच्या मतांच्या टक्केवारीत विक्रमी वाढ झाली आहे. यावरून 2024 च्या निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा ऐतिहासिक विजय नोंदवणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी म्हटले.