नवी दिल्ली(प्रतिनिधी) – 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पराभव झालेल्या 160 जागा 2024 च्या निवडणुकीपर्यंत मजबूत करण्यासाठी भाजपने एक खास रणनीती आखली आहे. त्याअंतर्गत भाजप या सर्वच 160 लोकसभा मतदार संघांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 45 हून अधिक रॅली आयोजित करण्याची जबाबदारी महाराष्ट्रातील नेते विनोद तावडे यांच्यासह काही विशिष्ट नेत्यांवर टाकण्यात आली आहे. यामुळे दिल्ली दरबारात विनोद तावडे (Vinod Tawde) यांचे वजन वाढल्याची चर्चा सुरु झाली आहे.
भाजपने आपले 3 राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, सुनील बंसल व तरुण चुघ यांच्या खांद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या रॅलींची जबाबदारी सोपवली आहे.
विनोद तावडे यांनी 2014 मध्ये सत्तेत आलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारमध्ये शिक्षणमंत्री होते. पण 2019च्या निवडणुकीत अचानक त्यांचे तिकीट कापण्यात आले. यामुळे तावडे यांना मोठा धक्का बसला होता. पण त्यांनी आपल्या वेदना केव्हाच सार्वजनिक केल्या नाही. एखाद्या निष्ठावंत कार्यकर्त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या मतदार संघातील भाजप उमेदवाराचा प्रचार केला होता.
Hasan Mushrif case : उच्च न्यायालयाचा दणका; किरीट सोमय्यांची ‘त्या’ प्रकरणी होणार चौकशी
2019 नंतर तावडेंची भाजपच्या राष्ट्रीय सचिवपदी निवड झाली. त्यानंतर त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन भाजपने 2021 मध्ये त्यांना राष्ट्रीय सरचिटणीसपदावर बढती दिली. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप अध्यक्ष जे पी नड्डा या जागांवरून मिळालेल्या फीडबॅकच्या आधारावर पुढील व्यूहरचना आखत आहेत.