दौसा (राजस्थान) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले. दिल्ली-दौसा-लासोत असा हा 246 किमीचा पहिला टप्पा आहे. हा एकूण 1386 किमीचा मार्ग असून त्याच्या विकासासाठी 12150 कोटी रुपये खर्च येणार आहे. आज उद्घाटन झालेल्या मार्गामुळे दिल्ली ते जयपुरचा प्रवास आता पाच तासांऐवजी साडेतीन तासांत पूर्ण होणार आहे.
हा संपूर्ण मार्ग पूर्ण झाल्यानंतर दिल्ली ते मुंबई हे अंतर कापायला 24 तासांऐवजी केवळ 12 तास लागतील. हा महामार्ग सहा राज्यांतून जाणार आहे. यामुळे अनेक महत्त्वाची ठिकाणे वेगवान मार्गाने जोडली जाणार आहेत. तसेच या भागातील पायाभूत सुविधा आणि विकासाला चालना मिळणार आहे.
नरेंद्र मोदी म्हणाले की, उत्तम रस्त्याचे जाळे उभारणे म्हणजे विकासाला चालना देण्यासारखे आहे. त्यातून कनेक्टीव्हीटी सुधारते आणि ग्रोथ इंजिन म्हणून हे प्रकल्प उपयोगी ठरतात. त्यामुळेच देशात अनेक ठिकाणी जागतिक दर्जाचे हमरस्ते उभारण्यात येत आहेत, असे ते म्हणाले.
Shashikant Warise : मृत पत्रकार वारिसेंच्या कुटुंबीयांना शासनाकडून 25 लाखांची मदत – मंत्री सामंत
एका संशोधन अहवालाचा हवाला देऊन मोदी म्हणाले की, पायाभूत सुविधांमध्ये केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीचा परतावा दुप्पट स्वरूपात मिळतो आणि अशा प्रकल्पांमध्ये गुंतवणूक आकर्षित होत असल्याने देशाच्या अर्थकारणालाही चालना मिळते. केंद्र सरकारने राजस्थानातील पायाभूत सुविधांना मोठीच चालना दिली आहे. गेल्या नऊ वर्षात या राज्यात या क्षेत्रात 50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असल्याचे त्यांनी सांगितले. दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे मुळे कर्मचारी, शेतकरी, आणि परिवहन ऑपरेटर्स अशा सर्वांनाच लाभ होणार आहे.