मुंबई – काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन सत्तास्थापन करणार होते. त्याआधीच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सरकार आल्याने राज्यातून टीकेची झोड उठली होती. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भाजपवर टीकेची तोफ डागली.
सोनिया गांधी म्हणाल्या कि, महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सत्तास्थापनेचा निर्लज्ज प्रयत्न केला. सत्तास्थापन करण्यासाठी भाजपने राज्यपालांचा वापर केल्याचा आरोपही त्यांनी केला. तर तीनही पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने भाजपचा डाव अखेर उघडकीस आला. तत्पूर्वी सोनियांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीसाठी उपस्थित राहण्याबाबत अद्याप काही ठरले नसल्याचे सांगितले.
Congress interim president Sonia Gandhi during Congress parliamentary party meet: Political leaders of India were not allowed in Jammu & Kashmir but some European MPs were, it was a shameful act by Narendra Modi & Amit Shah. https://t.co/Y34hgx702L
— ANI (@ANI) November 28, 2019
दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीतील मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उद्या होणाऱ्या शपथविधीचे आमंत्रण देण्यासाठी उध्दव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी बुधवारी सायंकाळी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. आघाडीला पाठींबा देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी सोनिया गांधी यांचे आभार मानले.