पुणे – राज्य सरकारने अधिवेशन घेण्याची हिंमत दाखवावी, असे चंद्रकांत पाटील म्हणतात. मग पंतप्रधानांनाही लोकसभेचं अधिवेशन घेण्याची हिंमत आहे की नाही यावर चर्चा होऊ शकते, असे बोलत जलसंपदा मंत्री जयंत पाटील चंद्रकांत पाटील यांच्यावर टिकास्त्र सोडले.
महाविकास आघाडीत सर्व काही अलबेल आहे. पण, आता चंद्रकांत पाटील यांनाच स्वप्ने बघण्याचा छंद आहे, त्यावर मी काय बोलणार, असा चिमटाही त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्याबाबत काढला.
पुण्यातील एका बैठकीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांने केलेल्या विधानवर निशाना साधण्यात आला.
राज्य सरकार अधिवेशन का घेत नाही, याच कारण जगजाहीर आहे. तरीही केवळ राजकारण म्हणून हे बोलले जात आहे. सध्या करोना संसर्ग सुरू आहे, त्यामुळे केंद्रात पंतप्रधान आणि लोकसभेचे सदस्य एकत्र येऊ शकत नाहीत. हीच परिस्थिती देशातील सर्व राज्यांना लागू आहे. करोनाचा संसर्ग वाढल्याने आपण अधिवेशन घेणं थांबवलं आहे, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, लॉकडाऊनबाबत वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी वेगवेगळी रणनिती ठरवावी लागेल. करोनाचं संकट अजून टळलेलं नाही. पण, परिस्थिती थोडी बरी आहे. मात्र, लॉकडाऊनचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, असेही पाटील यांनी सांगितले.
पदोन्नतीतील आरक्षणावर मतभेद नाही…
पदोन्नतीतील आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात कोणतेही वाद नाहीत. कोर्ट, कचेरी आणि कायद्याच्या स्तरावर काही निर्णय झाले आहेत. त्यातून मार्ग कसा काढायचा याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अजित पवार पदोन्नतीतील आरक्षणाच्या विरोधात असल्याचं चित्रं रंगवलं जात आहे. काही लोक हे काम करत असून हे दुर्देवी आहे. या मुद्दयावरून सरकारमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. याबाबत कायद्याचा अभ्यास करून उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या अधीन राहूनच काम करावे लागेल, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
मराठा आरक्षणाप्रश्नी संभाजीराजे अग्रेसर…
मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही छत्रपती संभाजीराजेंची सुरुवातीपासूनची भूमिका आहे. राज्यातील सर्व मराठा नेत्यांनी आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. त्यात संभाजीराजे अग्रेसर आहेत. पण हा प्रश्न केंद्राच्या हातात आहे. लोकसभेत घटना दुरुस्ती करून निर्णय घ्यावा लागेल. त्यासाठी सर्वांना भेटून पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत भूमिका पोहोचवण्याचं काम संभाजीराजे करत आहेत. त्यामध्ये चंद्रकांत पाटील म्हणतात ते सर्व खरं असतं असं नाही. त्यामुळे त्यावर भाष्य न केलेलं बरं. मराठा आरक्षणाचा प्रश्न जटील आहे. तो सुटायला हवा, असा सगळ्यांचाच आग्रह आहे, असंही जयंत पाटील म्हणाले.
पदोन्नतीतील आरक्षणावर मतभेद नाही…
पदोन्नतीतील आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात कोणतेही वाद नाहीत. कोर्ट, कचेरी आणि कायद्याच्या स्तरावर काही निर्णय झाले आहेत. त्यातून मार्ग कसा काढायचा याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अजित पवार पदोन्नतीतील आरक्षणाच्या विरोधात असल्याचं चित्रं रंगवलं जात आहे. काही लोक हे काम करत असून हे दुर्देवी आहे. या मुद्दयावरून सरकारमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. याबाबत कायद्याचा अभ्यास करून उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या अधीन राहूनच काम करावे लागेल, असे पाटील यांनी स्पष्ट केले.