मुंबई : पालघर साधू हत्याकांड प्रकरण सीबीआयकडे देण्यास महाराष्ट्र सरकारनं मान्यता दिली आहे. पालघरच्या गडचिंचले गावात दोन वर्षांपूर्वी जमावानं दोन साधूंची ठेचून हत्या केली होती. या प्रकरणी सीआयडीकडून तपास सुरु होता. आता हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, मागील काही दिवसापासून हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी सातत्याने भाजपकडून करण्यात येत होती. राज्यात सत्ता बदलानंतर आता नव्या सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे देण्यास प्रतिज्ञापत्राद्वारे मान्यता दिली होती. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे वर्ग केला जाणार आहे.