नवी दिल्ली – पाकिस्तानमध्ये अडकलेले 133 भारतीय नागरिक मायदेशी परतणार आहेत. येत्या सोमवारी ते वाघा बॉर्डरवरुन भारतात येतील. पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाने याबाबत माहिती दिली आहे. उच्चायुक्त कार्यालयाकडून भारतात परतणाऱ्या नागिरकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
भारतीय उच्चायुक्त कार्यालयाने इस्लामाबादमधील उच्च न्यायालयात एक याचिका दाकल केली होती. यामध्ये 4 भारतीय नागरिकांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती. चारही नागरिकांच्या शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे त्यांना भारतात जाण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती.