इस्लामाबाद – गेल्या आठवड्यात बलुचिस्तानमधील कार्यकर्त्यांच्या मोर्च्यावर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ पाकिस्तानातील प्रसिद्ध लेखक आणि पत्रकार हनिफ मोहम्मद यांनी आपला सितारा ए इम्तियाझ पुरस्कार सरकारला परत केला आहे. सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये हनिफ मोहम्मद यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे.
बलुचिस्तान सरकारकडून बलुच नागरिकांचे अपहरण आणि छळ केला जात आहे. त्याचा निषेध म्हणून आपण सितारा ए इन्तियाझ पुरस्कार परत करत असल्याचे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. पत्रकारांनी बलुच छावण्यांमध्ये केली जात असलेली कारवाई प्रत्यक्ष बघितली आहे.
नव्या पिढीला किमान प्रतिष्ठाही दिली जात नाही, हे बघून खेद वाटतो आहे. बुधवारी इस्लामाबाद पोलिसांनी बलुच कार्यकर्त्यांच्या मोर्च्यावर लाठीमार केला. हे सर्व कार्यकर्ते आपल्या निकटवर्तीयांच्या अपहरणाविषयी आणि न्यायबाह्य हत्यांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी राजधानीमध्ये आले होते.
किमान २०० कार्यकर्त्यांना अटक केली गेली आहे. या कार्यकर्त्यांवर अश्रुधूर, लाठीमार आणि पाण्याचे फवारेही मारले गेले होते. .याचा निषेध म्हणून आपण सितारा ए इम्तियाझ पुरस्कार परत करत असल्याचे हनिफ मोहम्मद यांनी म्हटले आहे. बलुच कार्यकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा अनेक राजकीय नेते,संघटना, मानवतावादी गट आणि विश्लेषकांकडूनही निषेध केला जातो आहे.