पाबळ येथील कृषी उत्पन्न उपबाजाराचे उदघाटन शिरूर आंबेगावचे लोकप्रतिनिधी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे हस्ते व आमदार अशोक बापू पवार यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाले. त्यावेळी या उपबाजार उभारणीचे काम अडचणीतून मार्गी कसे लावले याचे प्रास्तविक माजी सभापती व विद्यमान संचालक शंकर जांभळकर यांनी केले त्यावेळी या जागेचा पूर्वी होत असलेला अवैध वापराबाबत भाष्य केले त्याचाच धागा पकडून वळसे पाटील यांनी पोलीस अधीक्षकांना सूचना केल्या.
यावेळी पाबळचा पाणीप्रश्न, बैलगाडा शर्यतीचा प्रश्न यावर दिलीप वळसे पाटील यांनी भाष्य करताना अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक अभिजित देशमुख यांना सूचना केल्या.
त्यानंतर शिरूरचे आमदार अशोक बापू पवार यांनी पाबळ येथील पाणी हक्क परिषदेचे परमेश्वर चौधरी यांनी सुरू केलेल्या उपोषणाचे पार्श्वभूमीवर जेष्ठ नेते शरद पवार यांनी वेगाने दखल घेत , चार वेळा मी मुख्यमंत्री असताना हा पाणीप्रश्न मार्गी का लावला गेला नाही असे विचारून थिटेवाडी धरण उभारणीचा प्रश्न त्वरित कसा मार्गी लावला याची आठवण आपल्या भाषणात दिली.