ओतूर(प्रतिनिधी ) – सर्वत्र संचारबदी करण्यात आली असताना अजुनही काही लोक रस्त्यांवर फिरकत आहेत. प्रवास करित आहेत. पुणे नाशिक महामार्गावर आळेफाटा पोलिसांच्या वतीने नाकाबंदी करण्यात आलेली आहे.
या दरम्यान प्रत्येक वाहनांची कसून चौकशी केली जातीय. दुध,भाजी पाला व जीवनावश्यक सामग्री वाहतुक सोडुन कुठलेही वाहन येण्यास नाक्यावर बंदी करण्यात आलीय. तर आळेफाटा पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोणीही विनाकारण फिरु नये अशा सुचना देण्यात आल्यात प्रसंगी कडक कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे पोलिस निरिक्षक टी.वाय.मुजावर यांनी सांगितले.