12 मंत्र्यांवर संपर्कमंत्रिपदाची सोपवली जबाबदारी
मुंबई : ज्या जिल्ह्यात कॉंग्रेसचे पालकमंत्री नाहीत अशा जिल्ह्यांसाठी कॉंग्रेसने संपर्कमंत्री नेमले आहेत. संपर्कमंत्र्यांच्या माध्यमातून सरकारी योजना पोहविण्याचा तसेच संघटनात्मक विस्तार करण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न आहे.
राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कॉंग्रेसच्या वाट्याला 11 जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद आले आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्याकडे पालकमंत्रिपद ठेवलेले नाही.
उर्वरित जिल्ह्यांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचे पालकमंत्री आहेत. यापार्श्वभूमीवर कॉंग्रेसने सर्व 12 मंत्र्यांवर संपर्कमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यानुसार थोरात हे अहमदनगर आणि नाशिकचे संपर्कमंत्री असतील तर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर परभणी, बीड, जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
कॉंग्रेसचे संपर्कमंत्री
नितीन राऊत (अकोला, वाशिम), विजय वडेट्टीवार ( गडचिरोली, यवतमाळ, रायगड), यशोमती ठाकुर (बुलढाणा, गोंदिया), अमित देशमुख (औरंगाबाद, उस्मानाबाद), वर्षा गायकवाड (मुंबई उपनगर), अस्लम शेख (ठाणे), के. सी. पाडवी ( धुळे, जळगाव, पालघर), सतेज पाटील ( सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी), विश्वजीत कदम ( सांगली, सोलापूर)