मुंबई – आगामी दिवाळी सण लक्षात घेता नागरिकांनी अधिक खबरदारी बाळगावी. मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टंसिंग पाळावे, हात सातत्याने धुत रहावे या उपाययोजनांचा अवलंब करावा. दिवाळीत फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाला बाधा येऊ शकते. तसेच करोनात श्वसनाला त्रास असल्याने यंदाची दिवाळी फटाकेमुक्त असावी असं आवाहन प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जनतेला केले आहे. मात्र याचबरोबर दिल्ली, राजस्थान, ओडिशा, चंदीगड, कर्नाटक यांनी दिवाळीत फटाक्यांवर बंदी घातली आहे.
याच निर्णयावरून मात्र फेसबुकवर पोस्ट करत भाजप पक्षाचे उन्नाव खासदार साक्षी महाराज यांनी आक्षेप घेतला आहे.
काय म्हणाले साक्षी महाराज
‘ज्यावर्षी बकऱ्याशिवाय बकरी ईद साजरी केली जाईल, तेव्हा फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी होईल.’ फटाके न फोडण्याच्या राज्यांच्या निर्णयावर साक्षी महाराज यांनी फेसबुकवर जोरदार भाष्य केले आहे.’