लंडन: करोना साथीवर भारतात लक्ष केंद्रीत झाले आहे. त्यामुळे क्षयरोगाची चाचणी आणि निदान करण्यात दिरंगाई केली जात आहे. त्यामुळे यावर्षी त्या रोगाने भारतात सुमारे 95 हजार जण मरण पावतील, अशी भीती युरोपीअन रेस्प्रिरेटरी जर्नलमध्ये व्यक्त करण्यात आली आहे.
या नियतकालिकांने भारतासह चीन आणि दक्षिण अफ्रिकेमधील करोना आणि त्याच क्षयरोगावर होणारा परिणाम याबाबत अभ्यास प्रकाशित केला होता. सोशल डिस्टन्सिंगचा वापर केल्यामुळे कदाचित क्षयरोगाचा प्रसार कमी होऊ शकेल. मात्र सुमारे एक लाख 14 हजार जण त्यामुळे मरण पावतील. ( 95 हजार भारत, 13 हजार द. अफ्रिका आणि सहा हजार चीन)
अत्यंत वाईट स्थितीत मृतांची संख्या दोन लाखांवर पोहोचू शकते. या तीन देशांत जगातील क्षयरोगग्रस्तांपैकी 40 टक्के संख्या असते, असे या अहवालात म्हटले आहे. लंडन स्कूल ऑफ हायजिन या संस्थेने हा अहवाल बनवला आहे.