पुणे -इयत्ता अकरावीसाठी 3 लाख 69 हजार 149 जागांवर विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. तर, 1 लाख 66 हजार 601 जागा अद्यापही रिक्त आहेत. अकरावीसाठी तीन नियमित फेऱ्या झाल्या.
त्यानंतर एक विशेष तसेच “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ ही फेरीही घेण्यात आली. प्रवेशासाठी अनेकदा मुदतवाढ दिली. मात्र, तरीही प्रवेशाच्या जागा रिक्तच आहेत. करोनामुळे विद्यार्थी, पालक आपापल्या मूळगावी स्थलांतरित झाल्याचे आढळून आले आहे.
याबरोबर आयटीआय, विविध डिप्लोमांना विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. नामांकित व सोयीच्या महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्यामुळे प्रवेशाकडे पाठ फिरवली आहे.