नवी दिल्ली – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल अखेर आज आला. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी या निकालाचे वाचन सुरु केले. यावेळी नवाब रेबिया प्रकरण सात बेंचकडे पाठवले. यासोबत कोर्टाने राज्यपालाच्या कामावर देखील ताशेरे ओढले. यानंतर आता राजकीय प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. तर सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निकालवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अशात शिंदे गटाचे फायरब्रॅन्ड नेते शहाजीबापू पाटील नेते यांनी या निकालावरून संजय राऊत यांना खोचक सल्ला दिला आहे.
शहाजीबापू पाटील म्हणाले,’संजय राऊतांनी गुवाहाटीच्या जंगलात जावे आणि नरहरी झिरवळ यांनी झुरळ पकडायला जावे’ असं म्हणत टोला लगावला आहे.