मुंबई – शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. अमोल कोल्हे पक्ष्याच्या कार्यक्रमांना आणि बैठकांना देखील महिन्याभरापासून दांडी मारत आहेत. तर, दुसरीकडे मतदार संघातील नागरिक सुद्धा कोल्हेंवर नाराज असल्याचं दिसून आलं आहे. तर, काही दिवसांपूर्वी भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडेलवरून एक ट्विट करण्यात आलं होतं. यात अमोल कोल्हेंच्या कथित नाराजीवर भाष्य करण्यात आलं.
या ट्विटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याचे अध्यक्ष शरद पवार यांचा फोटो होता, “कॉंग्रेसचा बडा घर पोकळ वासा! शरद पवारांच्या बैठकीला अमोल कोल्हे गैरहजर! पक्षांतर्गत गटबाजी आणि संघर्ष यामुळे शरद पवार यांच्या पक्षाचा आता पुण्यात निभाव लागणं निव्वळ अशक्य आहे.! असं या ट्विटमध्ये म्हणण्यात आलं होत.
दरम्यान, या सर्व राजकीय घडामोडीनंतर आत स्वतः अमोल कोल्हे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अमोल कोल्हे म्हणाले की, ‘लोकशाहीमध्ये राजकारणाचा पोत बदलत चालला आहे. संसदेतील माझ्या भाषणनंतर पण अजूनही हा प्रश्न लोकांना पडत आहेत. जर तसं असेल तर लोकांनी माझे संसदेतील पूर्ण भाषण ऐकावं. माझ्या संसदेच्या भाषणात ‘कभी खुशी कभी गम’ आहे का? हे तुम्हाला कळेल, असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत.
तसेच ते पुढे म्हणाले, “देशाच्या विकासासाठी विरोधक सत्ताधारी असं काही नसतं. अनेक प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अजित पवार यांनी मदत केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मी मांडलेल्या प्रकल्पांना मंजूरी दिली म्हणून राजकीय चर्चा किंवा पक्ष याला काही अर्थ नाही. भागाच्या विकासासाठी मी काम करत राहिलं, असंही अमोल कोल्हे म्हणाले आहेत.