नवी दिल्ली – देशभरात महात्मा गांधींची 150 वी जयंती साजरी होत असताना आकाशवाणीचा वृत्त सेवा विभागाकडून महत्मा गांधीच्या उच्च आदर्श आणि मानवतेच्या मौलिक मूल्यांचे सातत्याने स्मरण करत आहे. आकाशवाणीच्या वृत्त सेवा विभागाने आज महात्मा गांधींची 150 वी जयंती साजरी केली. या प्रसंगी वृत्त विभागाच्या प्रमुख महासंचालक इरा जोशी यांनी “आकाशवाणी समाचार भारती’ मासिकाची आठवी आवृत्ती प्रकाशित केली.
हे मासिक महात्मा गांधींची 150 वी जयंती आणि त्यांची सेवा,समर्पण, स्वदेशी, स्वावलंबन, सहकार्य आणि स्वच्छतेच्या सिद्धांतांप्रती समर्पित आहे. त्यांनी महात्मा गांधींची तत्वे आणि आजच्या काळात त्यांच्या जागतिक शिकवणीचे अनुकरण करण्यावर भर दिला.
बापूंचे जीवन आणि त्यांच्या काळाविषयी गांधी प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नवी दिल्लीच्या एनएसडी मुख्यालयाच्या सदस्यांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला. याप्रसंगी ब्यूरो ऑफ आउटरीच कम्यूनिकेशन द्वारा नवीन प्रसारण भवनात गांधीजींच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. यातील सेल्फी पोईंट ने लोकांचे लक्ष वेधून घेतले.
आकाशवाणी समाचार भारतीच्या 8 व्या आवृत्तीत देशभरातील वृत्त विभागाच्या प्रादेशिक वृत्तसेवा विभागांनी पाठवलेले लेख आणि कविता प्रकाशित करण्यात आल्या आहेत. या मासिकात ईशान्य क्षेत्र पोर्ट ब्लेयर इथूनही लेख पाठवण्यात आले आहेत.
या मासिकात गांधीजींच्या स्वच्छता अभियानाचा उल्लेख असल्यामुळे ते खास बनले आहे. आणखी एक आकर्षण आहे गांधी जिल्हा जो गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या ह्यूस्टन, अमेरिका दौऱ्यामुळे चर्चेत आला. या मासिकात दुबई, काठमांडू आणि श्रीलंकेतील प्रसार भारतीच्या विशेष बातमीदारांनी गांधीजींच्या विचारांवर लिहिलेले लेख देखील प्रसिद्ध करण्यात आले आहेत.