नवी दिल्ली – संसदेचे विशेष अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. नवीन संसदेत प्रवेश करतना सर्व खासदारांना संविधानाच्या (Constitution) प्रतीचे वाटप करण्यात आले.
खासदारांना वाटप करण्यात आलेल्या संविधानाच्या प्रतींमधून “धर्मनिरपेक्ष’ आणि “समाजवादी’ हे दोन महत्त्वाचे शब्द वगळण्यात आले असल्याचा गंभीर आरोप लोकसभेतील कॉंग्रेसचे (Congress) नेते अधीर रंजन चौधरी यांनी केली आहे.
अधीर रंजन चौधरी म्हणाले, इंदिरा गांधींच्या सरकारने 1976 मध्ये “धर्मनिरपेक्ष’ आणि “समाजवादी’ हे दोन्ही शब्दांचा राज्यघटनेत समावेश करण्यात आला होता. पण मोदी सरकारने हे दोन शब्द मोठ्या हुशारीने हटवले आहेत.
जर आम्ही काही बोलण्याचा प्रयत्न केला. तर केंद्र सरकार म्हणेल की, जे सुरुवातीला होते. तेच दिले आहेत. संविधानातील दोन शब्द हटवून बदल करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांनी केला.
यावर केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघावालांनी प्रत्युत्तर देत म्हणाले, हे शब्द घटनादुरुस्तीनंतर जोडले गेली होती आणि प्रतींमध्ये राज्यघटनेच्या प्रस्तावनेची मूळ आवृत्ती होती.
भाजप नेते सुशील कुमार मोदी म्हणाले, अधीर रंजन चौधरींची माहिती कमी आहे. खासदारांना संविधानाची मूळ प्रत दिली आहे. यामुळे यावर वाद का होत आहे, असा सवाल त्यांनी केला.