मुंबई – महाराष्ट्रात ओबीसींचं राजकीय आरक्षण न्यायालयाने रद्द केले आहे. त्यामुळे राज्याचं राजकारण तापल असून भाजप या मुद्दावर आक्रमक झालं आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपने राज्यभरात चक्काजाम आंदोलन केलं. मात्र ओबीसी आरक्षण केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील तत्कालीन देवेंद्र फडणवीस सारकरमुळेच गेल्याचा आरोप प्रा. हरी नरके यांनी केला. या संदर्भात त्यांनी पुरावेही सादर केले आहेत.
हरी नरके यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, स्वत: फडणवीस 1 ऑगस्ट 2019 ला ओबीसी आरक्षणासाठी सामाजिक-आर्थिक-जात जनगणना 2011 चा डेटा केंद्र सरकारला पत्र लिहून मागतात आणि त्यांना मोदी सरकारचे 20 नोव्हेंबर 2019 ला उत्तर येते- या डेटावर अजून अभ्यास चालू आहे. तरीही ही गँग ओबीसीचा बुद्धीभेद करणारी, धादांत खोटी वक्तव्ये दररोज करीत आहेत.
पुन्हा सांगतात, केंद्राचा संबंधच नाही, जणगणनेचा डेटा चालतच नाही, राज्याने डेटा जमवायचा असतो, काँग्रेस सरकारनेच हा डेटा रद्द/अवैध ठरवला होता, मग तुम्ही लिहिलेले पत्र व तुम्हाला आलेले उत्तर काय आहे ? लबाड गॅंगचा जाहीर निषेध, असंही नरके यांनी म्हटलं.
प्रा. नरके यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये दोन फोटो शेअर केले आहे. जे की तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारला पाठवले होते.
सध्या भाजप ओबीसी आरक्षणाच्या मुद्दावर आक्रमक आहे. ओबीसी आरक्षण रद्द होण्यास महाराष्ट्रातील महाविका आघाडी सरकारचं जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे या मुद्दावरून सत्ताधारी विरोधक आमने-सामने आले आहेत.