नवी दिल्ली – देशांतर्गत उत्पादीत कोळशाचे भावही आता आयात कोळशाच्या भावानुसारच निश्चीत करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधिन आहे अशी माहिती सरकारकडून आज संसदेत देण्यात आली.
आंतरमंत्रालय समितीने सरकारला तशी शिफारस केली आहे. संसदेत कोळसा मंत्र्यांनी ही माहिती दिली. देशात दर्जेदार कोळसा उपलब्ध व्हावा आणि त्याच्या किंमती स्वस्त असाव्यात यासाठी हा निर्णय घेतला जाणार असल्याचे स्पष्टीकरण सरकारकडून देण्यात आले आहे.
देशांतर्गत कोळसा उत्पादन वाढवण्यासाठी कोळशाच्या खाणीचे शोध कार्य सुरू करून त्या खाणींचा खासगी क्षेत्रांना लिलाव करण्याची शिफारस आंतरमंत्रालय समितीने केली आहे. विविध खाणीतून उत्पादीत होणाऱ्या कोळशाची गुणवत्ता बेबसाईटवर प्रदर्शित करण्यात यावी, त्यावरून खरेदीदारांना कोणता कोळसा खरेदी करायचा याचा निर्णय घेणे शक्य होणार आहे असेही सरकारने ठरवले आहे असे त्यांनी सांगितले.