पुणे -महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) विभागातील अधिकाऱ्यांनी मोबाइल फोन बंद ठेवल्यास त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. गतवर्षी हे परिपत्रक एसटी महाव्यवस्थापकांकडून काढण्यात आले होते. मात्र, तरीदेखील अधिकाऱ्यांचे मोबाइल नॉट रिचेबल येत असल्याचे दिसून येते. परिणामी, परिपत्रकाची आठवण अधिकाऱ्यांना नुकतीच करून देण्यात आली.
बहुतांशवेळा विभाग नियंत्रक, विभागीय वाहतूक अधिकारी, आगार व्यवस्थापक आपापले मोबाइल बंद करून ठेवतात. परिणामी अपघात, आपत्कालीन परिस्थिती व महत्त्वाच्या कामाच्या वेळी संबंधित अधिकाऱ्यांशी महामंडळ व प्रवाशांना संपर्क साधणे शक्य होत नाही.