मुंबई : करोनामुळे संपूर्ण देशात झालेली परिस्थिती आणि त्यामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनने सर्वसामान्यांचे हाल झाले होते. त्यातच अन्य निर्बंधांमुळे जवळपास दीड वर्षांहून अधिक काळ बंद असलेल्या राज्यभरातील सर्व शाळा आजपासून पुन्हा सुरु झाल्या आहेत. राज्यातील सर्व शाळांनी सरकारकडून घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून शाळा सुरु केल्या. तसेच विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागतदेखील केले.
मुंबई, पुणे, ठाण्यासह राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये आज विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने गजबजून गेले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधत आहेत.
माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी या कार्यक्रमा अंतर्गत मुख्यमंत्री संवाद साधत आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या लहानपणीच्या आठवणी सांगितल्या. अनेक महिन्यानंतर शाळेची घंटा ऐकायला मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील कठीण काळ सुरु आहे.
शाळा सुरु करण्याचा निर्णय खुप अवघड होता. शाळेचे नाही तर आपल्या भविष्याच दार उघडलं आहे, हे उघडतांना खुप काळजीपुर्वक निर्णय घेतला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यानी शिक्षकांना आणि वडिलांना आपल्या मुलांची जबादरी घेण्याची विनंती केली.